Posts

Showing posts from January, 2013

भुताडी झांपा

टीव्हीवर दाखवतात तश्या सुहासनं स्टंपपासून ढांगा मोजल्या आणि हातातल्या बॉलला थुंकी लावावी की नाही याचा क्षणभर विचार केला. रोंगट्या गेल्या तीन ओवर आऊट होत नव्हता. सुहासनं पाचही बोटं तोंडात घातली. मळकट रबराची चव तोंडात घोळली आणि टपकन ओलेता बॉल एक टप्पा खाऊन नेमका रोंगट्याच्या बॅटवर पडला. रोंगट्यानं त्याच्याही नकळत बॅट फिरवली आणि बॉल बी-बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर ३०३च्या गॅलरीत जाऊन पडला. तोंडावर हात दाबला तरी पोरांच्या तोंडून अस्फुट किंकाळी फुटलीच. बॉल भुताडीच्या गॅलरीत पडला होता. भुताडीच्या घरातून काहीच बाहेर पडत नाही ...माणूस सुद्धा... असा सोसायटीतल्या पोरांमधे प्रवाद होता! हा निदान चौथ्या बॉलचा बळी होता. ... श्रीनं अस्वस्थपणे कुस बदलली. मोठं होणं म्हणजे नक्की काय हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. परवाच्याच सातव्या वाढदिवसानंतर आई-बाबांनी त्याला आता तो मोठा झालाय हे स्पष्ट सांगीतलं होतं. मोठं होणं म्हणजे खेळणी कपाटात भरुन ठेवणं, शाळेची बॅग झालंच तर कपडेही आवरुन ठेवणं असं असेल तर मोठं होणं वट्ट बोर होतं. मोठं होण्यात मजा असते जेव्हा टीव्ही बघत कधीही लोळत पॉपकॉर्न खाता येतात किंवा

साहित्यिक भौ- तेरी कहके ले ली रे बावा

म्हणजे संपलंच म्हणायचं एकदाचं! संमेलनाचं सुप वाजलं हा वर्तमानपत्रवाल्यांचा लई लाडका शब्द. तर तेही वाजून झालं. हल्ली होतं काय आहे की संमेलनाच्या अध्यक्षांची ओळख दिपिका चिखलीयापेक्षाही कमी असते. म्हणजे जे काही बापडे मराठी य्मयेच्या वाटेला गेलेले असतात केवळ तेच अध्यक्षांना साहित्यिकली ओळखु शकतात. आता या उत्सवांना एकदा श्टार व्हॅल्यु नाही म्हटलं की विचारतं कोण? अध्यक्षांनं एक तर लोकप्रिय तरी असावं किंवा समिक्षकप्रिय तरी...रमेश मंत्री, (गेले बिचारे) इंदिरा संतांना हरवुन (!!) अध्यक्ष झालेच होते की. त्यानं होतं काय की एक तर त्यांचा मेशेज जनमनात पोचतो किंवा मायमराठीच्या विचारधारेत ते कसली तरी भर पाडतात. आता काय एकूणच दोन्ही बाबतीत आनंद. जेव्हा पासून वेडा डब्बा आला, डब्बेवाल्या काकांनी ठरवुनच टाकलं की लोकांना जड, गंभीर काही म्हणजे काही पचत नाही. त्याच चालीवर संमेलनातल्या गंभीर परिसंवादांना फाटा मारण्यात आला. यावेळी म्हणे राजकीय नेत्यांसाठी माझं वाचन की कायसा परिसंवाद ठेवला होता. त्याला बहुतेक बगळ्यांनी दांडी मारली. साहाजिक आहे. राजकारणात टिकायचं म्हणजे साहित्यवगैरे विषयांपासून दुर असलेलं ब

आईराजा उदो उदो

आठवणींचा नुस्ता काला झालाय. नियमांचे गारगोटी अट्टहास होण्याआधीच्या देवी तुझ्या आठवणी, देवी तुझा गोंधळ. सातलाच रात्र व्हायची, लाईटीचे निव्वळ अपवाद, आग्रहही नसायचाच, लोक तसे समजुतदार होते. गोंधळाच्या रात्री मग तेलाचे पलिते पेटायचे. सरगाठ, निरगाठ, आतली गाठ, सगळं सगळं आवळुन आराधी, आराधणी जुन्या साड्यांचे पलिते बनवायचे. पलिते, घट्ट, सापासारखे, भप्पकन पेटून उठायचे नाही पण धुमसत राहायचे, रात्रभर. आराधी एरवी म्युन्सीपाल्टीत गटारगाडा ओढायचा पण नवरात्रात आकाशी निळ्या रंगाचा नेहरुशर्ट घालायचा. बघावं तेव्हा नशेत असल्यासारखे डोळे चढलेले, केस खांद्यावरुन खाली ओघळलेले, त्याच्याशी एक वाक्य बोलायचं म्हटलं की पाक्पुक व्हायचं. पण त्याच्या हलगीचं भारी आकर्षण. हलगी चढव्हायला आगीवर शेकावी लागायची. ताणलेल्या कातड्यावर फटकारलं की आवाज होतोच. कॅलिडास्कोप थोडा फिरवला की मला सुभाषदादाचा भाऊ आठवतो. भिमसेनांकडे शिकायचा. उन्हाळ्यात तो आला की रात्री गाण्यांची मैफल जमायची. सर्वात शेवटी त्याला कुणीतरी जोगवा म्हणायचा आग्रह करायचा. पेटी-तबला बाजुला सारुन भली मोठी परात तो उपडी घालायचा आणि त्यावर त