Posts

Showing posts from October, 2007

रंग

रंगावरुन मनाच्या तळाचे कंगोरे सांगणारा भविष्यवेत्ता भेटला होता मला एकदा. "बोल काय सांगु तुला? भुतकाळातली भुतं की वर्तमानाचे वर्तमान? म्हणत असशिल तर भविष्याचे आरसे आत्ताच दाखवीन उलगडून. ओळखशील स्वतःला आत्ताच, तर सावरशील कदाचित काळाच्या एखाद्या निसरड्या क्षणावर. मनापासुन ऎकशील तर कदाचित फायद्यात राहाशील नाहीतर थोडीशी गंमत समज आणि विसरुन जा" सुर्याची कुळं आणि चंद्राची मुळं खणून भविष्य वर्तवणारी असंख्य बिनचेहरयाची माणसे मी पाहीली होती. हातांवरच्या रेषात भुत-भविष्य शोधत हरवलेली माणसेही माझ्या पाहाण्यात होती. पण निसर्गाच्या अंगांगात भिनलेल्या रंगांचे, त्यांच्या अनंत छटांचे विलगिकरण करु पाहणारा हा पहिलाच. संधीला पंख असतात वायुचे, अशब्दाचे तीव्र कान आणि मौनाची बेजोड भाषा. "निळा" मी माझ्याच नकळत बोलता झालो. "विशाल! बच्चा, मोठं मन, मोठे विचार...आकाशाची भव्यता- सागराची खोली लाभली आहे तुझ्या आवडीला" निळ्या रंगाच्या अनंत छटा माझ्या डोळ्यां समोर तरळत राहिल्या. उत्तरे नसतातच, प्रश्नांचेच छंद होऊ पाहाताहेत आता. "बाबजी, पिवळा रंग? बुद्धाची करुणा आणि ऍनचं एकाकी पण दिसत

सृजन-सर्जनत्वाचे अपरंपार शोध

एखाद्या कलाकृतीचा अर्थ लावणे, तिला समजून उमजून घेणे आणि दिसणारया परिघाच्या आतील वर्तुळ शोधणे हे सृजनत्वाचे प्राथमिक लक्षण. कलाकृती "वाचणे" म्हणजे समिक्षा करणे हे गृहितक काही अंशी खरे असले तरी त्या समिक्षेची मांडणी, अभिव्यक्तीचे माध्यम आणि मुख्यतः कलाप्रकाराची खोलवर जाण या मुद्यांवर आपण सृजन आणि समिक्षक यांचे द्वैत समजु शकतो. सृजन आणि समिक्षक यांचे हे वर्गिकरण म्हणजे water tight compartmentalization नव्हे. पण समिक्षक हा दर वेळी सृजन असतोच असे नव्हे, कोरडेपणाने व्यवसायाचा भाग म्हणूनही समिक्षा होऊ शकते. पण सृजन हा कोरडा नसतोच आणि तो जाणकार असेल असे ही नाही आणि म्हणूनच त्याच्या मनोवृत्तीत ढाळून एखादा कलाप्रकार बघणे हा मोठा गंमतीचा अभ्यास होऊ शकतो. हा भुप राग, हा सकाळीच म्ह्टला गेला पाहिजे किंवा कुमारांनी इथे समेवर येणे अपेक्षित आहे किंवा हे शार्दुलविक्रिडीत म्हणजे मात्रांचे गणित हे असेच! समिक्षक होता होता राहिलेली, जाण असणारी ही सृजन जमात शास्त्रकाट्यांच्या कसोटीवरच कलेचा आस्वाद घेते. पण हा अभ्यास कधी कधी इतका कठोर होत जातो की रसिकतेची बाकी परिमाणे हळूहळू फिकुटत जातात. पुर्वी नाड

विदुषक

विदुषकाने एकदा त्याच्या दुखरया पायाकडे आणि नंतर लग्नाचं वय उलटून गेलेल्या त्याच्या मुलीकडे आणि निठल्ल्या, निकम्म्या मुलाकडे अनुक्रमे हताशपणे आणि तिरस्काराने पाहीलं. "या पोरानं काही उद्योगधंदा केला असता तर आज हा मोडका पाय घेऊन नाचावं लागलं नसतं, ना या पोरीच्या लग्नाची चिंता करावी लागली असती" विदुषकानं मनातल्या मनात विचार केला "आणि हो, त्या नव्या बेरकी मॅनेजरची बोलणीही खावी नस्ती लागली." मॅनेजरच्या आठवणीने विदुषक कसानुसा झाला. गेल्या काही महिन्यांपासुन त्याचं वय जाणवत होतं आणि सर्कसच्या त्या छोट्या तंबुचे नियम मोठे स्पष्ट होते; लंगड्या घोड्यांना तिथे जागाच नव्हती. विदुषकाला तरीही खात्री होती की या नव्या जमान्यात सर्कसला कोणी दुसरा जोकर सापडणार नाही. शिवाय त्यानं आज लंगड्या पायांनी मारलेल्या बेडूक उड्यांनाही पब्लीक बरं हसलं होतं. आजचा शो आठवून विदुषकाला जरा धीर आला आणि पायाचं दुखणं मागे सारुन त्यानं मॅनेजरच्या तंबुचा रस्ता धरला. "कदाचित येव्हढ्या वर्षांची सेवा आणि जुने दिवस आठवून देणारा आजचा परफॉर्मन्स, या बळावर एक जीर्ण पगार वाढ!" विदुषकाचं पायाचं दुखणं कुठल

सावित्री

-१- ... मी म्हटलं,"मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं" ... -२१- केवळ एका पत्रांतील दोन शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळ वेळां कांहीच सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले. कुठल्या पाखरांनी स्वरांची ओवणी केली. दिवस तिला अपरुप असतो, रात्र फुलवारी. पण तिच्या मनाला नाही सोसत शब्दांची बंदिषी. ती म्हणाली होती, अशीच कधीं तरी येईन-आणि दिवस लोटले तरी आलीच नाही. मग वाटेवरच्या बागेंत त्याला कोण भेटलं? कोण कुणाकडं निघालं होतं? बरोबर चालतांना पावलं आडखळलीं नाहींत. डोळे कुठंच रेंगाळले नाहीत. वाट ओळखीची झाली आणि बाजूच्या झाडांनी सावल्यांची तोरणं बांधली. खालीं पडलेल्या जुन्या पानांना पहिली आठवणहि उरली नाहीं. नदीच्या काठांवर ती बसली होती तेव्हां तिनं उगाच पाण्यांत खडा टाकून कुणाला भिवविलं नाहीं. एक सारस पक्षी दुरुन येऊन काठांशी गवतावर अलगद उतरला. त्याचं पाण्यांतलं प्रतिबिंब जरसुद्धा सरकलं नाहीं. पहिली पावसाची सर अचानक आली तेव्हां ती भिजत चिंब तशीच उभी राहिली. देवळाच्या आवारांत त्याच्याबरोबर फिरतांना तिनं सहज एक उत्सवांतील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वा

कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला

-१- Writer's Block :- अशी एक अवस्था ज्यात लेखकाला काही तरी सांगायचं असतं किंवा त्याला तसं वाटतं (की आपल्याला काही तरी सांगायचय) पण ते कागदावर उतरवता येत नाही. जरी या अवस्थेला Writer's Block असे नाव असले तरी बहुदा सर्व कलाकार या फेजमधून जाऊ शकतात. सर्वसाधारणपणे याला मेन्टल ब्लॉक असे ही म्हणता येऊ शकते. ही अवस्था काही दिवसांपासून काही वर्षांपर्यंत राहु शकते. अनुभुतींची कमतरता, कला माध्यमाचा तोकडेपणा, प्रतिभा आणि व्यवहार यांच्यातील अटळ ओढाताण ही यामागची सिद्ध झालेली काही कारणे आहेत. या व्यतिरीक्त मेंदुतील काही रसायनांचे असमतोल हे एक असिद्ध कारण आहे (स्वस्त भाषेत केमिकल लोचा). यावर उपाय म्हणून लेखकाने अश्या अवस्थेत सतत काही तरी लिहीणे आवश्यक असते, रोज निदान २-३ पाने. शक्यतो असे लिखाण दुय्यम दर्जाचे असल्याकारणे ते आपल्यापुरतेच ठेवावे हे इष्ट. -२- सगळंच अस्वस्थ आहे आभाळ गच्च भरुन यावं आणि सांडूच नये असं काही तरी एकेक श्वास शब्दांच्या बोलीवर उधार आणलेले शब्द सापडलेच नाहीत तर? अर्थांचे सारे कोलाज परत मागाल मला सारे? -३- "कागदा सारखा निरक्षर माझा हरी झाला" लिहू म्हणताच पाषाणाच

निवांत आकाशाचा एखादाच मनसोक्त तुकडा

इथे जरासे वेगळेच मुळे रुजवावित तर माती बेभरवशाची वीण उसवावी तर सोबतीला प्रकाशाची लख्खं तिरीप आणि आरश्यांना सलज्ज शिकवणुक लयबद्ध डोळ्यातुन देह भोगण्याची थांबेन तर टोकभर जागाही पुरेल अन चालेन तर समुद्र मागे सारावे लागतिल प्रिय मायावि क्षुल्लक अस्तित्वाला निरंतराचे अगम्य आव्हान या क्षणी माझ्या खिडकीच्या टोकावरुन दिसणारा निवांत आकाशाचा एखादाच मनसोक्त तुकडा तोच खरा