Posts

Showing posts from May, 2007

यमुआत्त्याचं अचाट धाडस

यमुआत्त्यांनी डोळे किलकिले करुन बघीतलं तेंव्हा त्यांच्या इतक्याच जुन्या घड्याळाने सहाचे ठोके दिले. "वसंतराव असते तर घड्याळ्याच्या ठोक्याला चहा द्यावा लागला असता" यमुआत्त्यांनी सुस्कारा सोडला. यमुआत्त्यांखेरीज, वसंतरावांच्या आठवणी आणि हे घड्याळ अश्या दोनच गोष्टी त्या वाड्यात ताज्या होत्या. यमुआत्त्यांनी परत उगाचच सुस्कारा सोडला. वेणीफणी केली तर कदाचित थोडं प्रसन्न वाटेल असं वाटून त्यांनी जरा हालचाल केली आणि तेवढ्यात त्यांचे गुडघे बोलले. "हरे राम! हरे कॄष्ण!! सगळं बसल्या जागी होतय म्हणून बरं आहे. अन्यथा या गुढघ्यांनी जेरीला आणलं आहे. देवा.." यमुआत्त्या जमीनीवर हात रोवत कशाबश्या उठल्या. दिवाबत्ती केली नाही तर वसंतराव वरुनही आपल्यावर ओरडतील अशी त्यांना सारखी भिती वाटायची. तसं बघीतलं तर वसंतराव कोणीतरी महाभयंकर जमदग्नीचे अवतार होते अश्यातला भाग नव्हता. रेव्हेन्युतून रिटायर्ड झालेले ते एक साधेसुधे कारकुन होते. ते जिवंत असताना गल्लीतली शेंबडी पोरंही त्यांना घाबरली नसतील पण हिंदुधर्माच्या परंपरेनुसार ते म्हणजे यमुआत्त्यांचं सर्वस्व होते. आता अश्या बायकांसाठी नवरा नाही हे सत

Collage: उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म

कोलाज तुकडा १: मला "तुम बिन" सिनेमा विविध कारणांसाठी आवडला. त्या गोष्टीचा साधेपणा, पात्रांची संवेदनशीलता, गाणी इत्यादी इत्यादी..त्यात अजून एक मजेदार गोष्ट मला आवडते म्हणजे संथाली जेंव्हा प्रियांशुला सतत मधे मधे करण्यासाठी रागावते तेंव्हा तो बाहेर जाऊन पिज्झा घेऊन येतो आणि संथालीला सांगतो "मुझे जब भी कोई डांटता है, तो मुझे बहोत जोर से भुक लगती है." खाण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात!! कोलाज तुकडा २: कॅन्टीन मधे मला जेवायला लागणारा वेळ हा तसा बरयापैकी थट्टेचा विषय आहे. म्हणजे मी अगदी "रवंथ" प्रकरणात मोडत नसलो तरी, शर्यत लागल्या सारखा ५ मिनीटातही मी "गिळू" शकत नाही. माझा अगदी साधा प्रश्न असतो, ही जी काही मरमर ज्या गोष्टी साठी सुरु आहे, तीच जर तुम्ही उरकणार असाल, तर कशाला अर्थ आहे? असो. हल्ली मी हा प्रश्न न विचारता, नवा प्रश्न विचारत असतो; "आज खाण्यासाठी जगणार की जगण्यासाठी खाणार?" थांबा. उत्तर द्यायची घाई करु नका. हा मोठा तात्विक प्रश्न नाहीये. याचा कॉमनसेन्सशीही संबंध नाहीये. जरा तुमच्या ताटात/डब्यात डोकावून बघा. आज तुम्ही सुरण,

दुर्मुखाच्या आयुष्यातील निरर्थकता!

'ऑऑऑ' दुर्मुखाने अगणिताव्यावेळी जांभई दिली. "आज शुक्रवार, पाच वाजलेत म्हणजे टिंब्या गेला असेल. आपणही कटोफाय" मनाशीच पुटपुटत दुर्मुख लॅपटॉपची सुरळी करु लागला. " करा लॅपटॉपची सुरळी आणि घाला.." "दप्तरात!" टिंब्याच्या आचकट विचकट कॉमेंटला मनातल्या मनात (अजून कसं?) तत्परतेने उत्तर देतं दुर्मुख जरा जास्तच जोरात बोलला. "कायरे कसले प्लॅन करतोयस? weekend चे?" "नाही गं" ठकीला सांगावं की कसं या गोंधळात दुर्मुख असतानाच ठकी अगदीच जवळ आली. "या बाईला दुसरया पासून किती अंतरावर थांबावं हे कळत नाही" हा दुर्मुखचा विचार ठकीने लावलेल्या उंची perfumeच्या वासात विरुन गेला आणि स्वतःच्या नकळत दुर्मुखाने बॉसचे लॅपटॉपबद्द्लचे विचार जमतील तेवढे सभ्य करुन सांगितले. "तसंच काही नायरे दुर्मुख" ठकीने मानेला एक सुरेख झोका दिला. "माझं नाव दुर्मुख नाहीये", दुर्मुख मनातल्या मनात (परत?) पुटपुटला. "पण मगं माझं खरं नाव काय?" दुर्मुखाला स्वतःलाच ते आठवलं नाही तसं या त्रासदायक विचारांपेक्षा ठकीकडे नीट लक्ष दिलेलं बरं असं त्यानं ठरव

नाटकाला..एक "जाणं"

नाटकाला जाणं ही नाटका इतकीच एक सांस्कृतिक बाब आहे या निष्कर्षाला मी आता येऊन पोचलो आहे. सध्या मुळातच इतकी "विनोदी" नाटकं येताहेत की त्या विनोदांची दहशतच बसावी. त्यामुळे अशात नाटकाला जाण्याचा योग आला नसला तरी आपण आपल्या संस्कृतीचे पालन करत असुच या या आशे वर ही प्रस्तावना संपवतो. माझ्या नाटक बघण्याचे मुख्यतः ३ टप्पे असावेत. गुलझारांना नमस्कार करुन पहीला फ्लॅशबॅक.. आठवतय तेंव्हा पासुन मी कलोपासकच्या नाटकांना जातोय. ही लातूरची एक मस्त संस्था आहे. बहुतेक प्राध्यापक मंडळींनी चालवलेली आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम दाखवणारी. इथे मी काय नाही पाहीलं? राजा ईडीपस, महानिर्वाण, शांतता कोर्ट चालु आहे... मराठीतील एकाहुन एक सरस नाटकं. नुस्ती नाटकंच का? वा उस्ताद! होण्या अगोदरचा झाकीर! माझ्या आठवणीनुसार तो अल्लारखां सोबत आला असेल पहील्यांदा आणि जेमतेम २०-२२ वर्षांचा असेल. त्याचा एका बहीणीच्या शेजारी मी बसलेलो, खुप लहान असेन, बोटांनी ताल धरला होता. बरयाच वेळ ते बघून ती आईला म्हणाली " समज चांगली आहे. शिकवाल तर बरं"..हाय रे कंबख्त. उमज समज नसणार वय, शुन्यभर अक्कल आणि भिडस्तपणा या सद